आधी वाचलेल्यांनी (आणि पहिल्यांदाच वाचणार्यांनीदेखील) पुन्हा वाचण्याची गरज नाही. अगदीच वेळ जात नसेल तर ठीक आहे...!
असो.
------

आपल्या समाजात काही साथीचे रोग आहेत. डेंग्यू, मलेरियापेक्षाही भयंकर वेगाने फैलावणारे. गणपतीतली डिजिटल "भिंताडगिरी', नवरात्रातला दांडिया-मॅनिया आणि आता दिवाळीतला पहाटींची धुडगूस.
या रोगांचे व्हायरस कसे येतात, कसे पसरतात आणि धोकादायक असल्याचे माहित असूनही अनेक लोक त्याला कसे फशी पडतात, का...ही कळत नाही. गेले एक-दोन दिवस पेपरातल्या मनोरंजनाच्या जाहिरातींवर तुम्ही नजर टाकली असेल, तर हा दिवाळी पहाट कार्यक्रमांचा उच्छाद सहज लक्षात येईल.
कुणीतरी अला

बरं, हे कार्यक्रम पण भल्या पहाटे साडेपाच, सहाला वगैरे असतात. आता घरी पणत्या, दिवे लावायचे सोडून, कोण उपटसुंभ पहाटे पहाटे पाचशे-हजारांची तिकिटं काढून थेटरांमध्ये दिवे लावायला जातात कोण जाणे! आमच्यासारख्या फुकट पासवाल्यांचं तरी एकवेळ समजू शकतो. पण तिकीट काढून काय जायचं असल्या पावऱ्या नि तबले ऐकायला?पावसाळा आला की पावसाळलेली गाणी, हिवाळ्यात गारठलेली गाणी, दिवाळीत मांगल्यरसाने बदबदलेली गाणी...काय चाललंय काय? गोडाचं किती अजीर्ण सहन करायचं?
पुढच्या वर्षाच्या दिवाळीसाठी एक प्रस्ताव आहे. पाहा, पटलं तर. नाहीतरी काय, घरंदारं सोडून बाहेर थेटरातच दिवे लावायचेत ना, मग मल्लिका शेरावतच्या हॉट सीन्सवर (प्रात्यक्षिकासह) रसभरीत

बघा, विचार करा. सुचवा आणि आनंद घ्या!
-------